
कांतीलाल पाटील : दैनिक तरुण गर्जना
मुंबई,दि.१३ : ठाकरे मगध प्रांतातून आलेत. त्यांनाही मराठी येत नव्हते. पण इथे ते आल्यावर महाराष्ट्राने त्यांना सामावून घेतले. आज ते मराठीसाठी लढत आहेत. असे वक्तव्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केले.
चार चौघात कोणाला मारण्याची भाषा करताय हे षडयंत्र आहे. मी दोन महिने मुंबईमध्ये आहे.ठाकरेंनी मला मराठी शिकवावे असे आवाहन शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केले. महाराष्ट्र मध्ये खूप मोठे मोठे संत झालेले आहेत. महाराष्ट्रातील संतांचा ज्ञान मराठीत आहे. मला मराठी शिकायचं आहे. अशी इच्छा शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी बोलून दाखवली.




